वडिलांचा आशीर्वाद - एक सुंदर बोधकथा – Marathi Story

 

वडिलांचा-आशीर्वाद-सुविचार-status-सुंदर-विचार-मराठी-विजय-भगत-vb-good-thoughts-in-marathi
वडिलांचा-आशीर्वाद-सुविचार-status-सुंदर-विचार

वडिलांचा आशीर्वाद - एक सुंदर बोधकथा – Marathi Story

गुजरातमधील खंभायत येथील एका व्यावसायिकाची ही सत्य घटना आहे. 
असे माझ्या वाचनात आलेले आहे. जेव्हा त्या व्यावसायिकाला वाटले कि आता आपला 
शेवट निश्चित आहे. तेव्हा त्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला जवळ करून म्हणाला की... माझ्या लाडक्या मुला... तुला द्यायला माझ्याकडे  संपत्ती  नाही...! पण मी जीवनभर सत्य 
आणि सत्यतेनेच काम केले आहे. माझा आशीर्वाद आहे की... तु आपल्या जीवनात खूप खूप 
सुखी राहशील... तु जरी धूळ - मातीलाही स्पर्श केला तरी त्याचे देखील नक्कीच सोने होईल.

मुलाने डोके टेकून वडिलांच्या पायाला स्पर्श केला. मुलाच्या डोक्यावर हात ठेवून वडिलांनी आशीर्वाद दिला आणि अगदी संतोष पूर्वक आपले प्राण सोडले.


आता घराची सगळी जवाबदारी मुलगा धर्मपाल याच्यावर आली. त्याने छोट्या गाडीवरून 
आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचा व्यवसाय हळू हळू वाढू लागला.  

एक छोटीसी दुकान घेतली. व्यवसायात आणखी वाढ झाली.  आता  शहरातील संपन्न 
लोकांमध्ये धर्मपाल ची गणना होऊ लागली.  त्याचा असा विश्वास होता की हे सर्व माझ्या 
वडिलांच्या आशीर्वादाचे " फळ "आहे...! कारण त्याने आयुष्यात खूप दुःख सहन केले 
परंतु कधीही संयम सोडला नाही, श्रद्धा सोडली नाही, प्रामाणिकपणा सोडला नाही, म्हणून 
त्यांच्या बोलण्यात शक्ती आली आणि त्याचे आशीर्वाद कामी आले आणि मी आनंदी सुखी 
झालो. हे तो नेहमीच बोलत असे.

एक दिवस धर्मपाल च्या मित्राने त्याला विचारले... धर्मपाल जर तुझ्या वडिलांमध्ये इतकी 

शक्ती होती... तर मग त्यांनी स्वत: साठी काहीही का केले नाही...?  ते का आनंदी नव्हते...?  धर्मपाल म्हणाला...मी वडिलांच्या शक्ती बद्दल नाही बोलत आहे... तर त्यांच्या आशीर्वादाच्या प्रभावा बद्दल बोलत आहे. अशा प्रकारे, तो पुन्हा पुन्हा आपल्या वडिलांच्या आशीर्वादा बद्दल सांगत असे आणि लोकं त्याला फक्त " वडिलांचा आशीर्वाद " अशी नावे 
देत असत. त्यावर धर्मपालाला काहीही हरकत नव्हतीच. धर्मपाल च्या मते त्यांना आपल्या वडिलांच्या आशीर्वादासाठी पात्र व्हायचे होते.

काही वर्ष असेच निघून गेले. नंतर धर्मपाल ने परदेशात व्यवसाय करायला सुरुवात केली.
तिथेही त्याने जो व्यवसाय केला... त्यात त्याचा चांगलाच नफा झाला.

एक दिवस त्याच्या मनात आले कि व्यवसायात आपल्याला नेहमी नफाच नफा होतो... 
एकदा तरी आपण तोट्याचा व्यवसाय करायचा...! म्हणून त्याने आपल्या एका मित्राला 
ज्या व्यवसायात नेहमी तोटा होतो असा व्यवसाय सांगायला सांगितले  

त्याच्या मित्राला वाटले की, धर्मपाल आपल्या यशाची आणि संपत्तीची खूप फुशारकी मारतो 

आता त्याचा अहंकार दूर करण्यासाठी... याला असा व्यवसाय सांगतो की त्याला नक्कीच 
तोटा होईल. म्हणून मित्राने धर्मपाल ला सांगितले की, तू भारतातून लवंग खरेदी कर आणि जहाजात भरून आफ्रिकेच्या झांझिबारला विकुन ये.  धर्मपाललाही हे योग्य वाटले.

कारण झांझिबार हा लवंगाचाच देश आहे. व्यावसायिक तिथून लवंग भारतात आणतात 

आणि दहा ते वीस पट किंमतीला विकतात. पण जर आपण भारतात खरेदी केली आणि 
झांझीबार मध्ये विकली तर त्यात नक्कीच तोटा होणार आहे.  पण धर्मपालने ठरवले की 
मी लवंगा भारतातुन स्वतः झांझीबार येथे  जाऊन विक्री करणार. मला हि पहायचे आहे 
की " वडिलांचे आशीर्वाद " काय समर्थन देतात...!

तोटा  करण्यासाठी... धर्मपाल ने भारतातील सर्व लवंग  विकत घेतल्या आणि त्या  जहाजात 

भरल्या आणि झांझीबार बेटावर पोहचला. झांझिबारमध्ये सुलतानाचे राज्य होते.
धर्मपालने तेथील व्यावसायिकांना भेटायला लांबवर प्रवास केला.

 एकदा त्याने, समोर एक व्यक्ती अनेक सैनिकांच्या बंदोबस्तात जात असलेला पाहिला,  

त्याने एकाला विचारले की ते कोण आहे. तर तो म्हणाला की हे ह्या राज्याचे सुलतान आहेत. सुलतानने त्याच्याकडे बघून त्याला त्याची ओळख सांगण्यास सांगितले. धर्मपाल म्हणाला की
मी भारतातील गुजरातचा प्रांत ' खंभायत ' चा व्यावसायिक आहे आणि येथे व्यवसाय 
करण्यासाठी आलो आहे.  सुलतान त्याला एक व्यापारी मानुन...  त्याचा आदर करत 
त्याच्याशी बोलू लागला.

धर्मपालने पाहिले की सुलतानाबरोबर खूप सैनिक आहेत, परंतु त्यांच्या हातात फक्त चाळण्या आहेत, तलवार, बंदूक वगैरे काही नाही.  तो आश्चर्यचकित झाला. आपले सैनिक असे घेऊन 

का निघत आहेत हे त्याने नम्रपणे सुलतानाला विचारले.

त्यावर सुलतान हसला आणि म्हणाला की गोष्ट अशी आहे... आज सकाळी मी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला आलो होतो आणि माझ्या बोटातील एक हिरेजडित अंगठी कुठेतरी 

पडली. वाळूमध्ये अंगठी नेमकी कुठे पडली हे मला माहित नाही. म्हणूनच मी हे सैनिक 
सोबत आणले आहेत...! ही वाळू ह्या चाळणीने छाणून मी माझी अंगठी शोधणार आहे.

 धर्मपाल म्हणाले - अंगठी खूप महाग आहे का...?

 सुलतान म्हणाला – नाही... माझ्याकडे त्यापेक्षा बरीच मौल्यवान अंगठी आहेत.
पण ती अंगठी एका फकीरचा आशीर्वाद आहे.
माझा विश्वास आहे की माझे राज्य त्या फकीरच्या आशीर्वादाने खूप सामर्थ्यवान
आणि आनंदी आहे. म्हणून माझ्या मनात असे आहे की... 
माझ्या राज्यापेक्षा ती अंगठी अधिक मूल्यवान आहे.

हे बोलल्यानंतर सुलतानाने पुन्हा विचारले, "बोला, सेठ - तुम्ही या वेळी काय आणले आहे...? धर्मपाल म्हणाला – लवंगा... सुलतान  आश्चर्याने बघतच राहिला ..

 अहो.. हा लवंगाचाच देश आहे...
आपण इथे लवंगा विकायला का आला आहात...?
असा सल्ला तुम्हाला  कोणी दिला नक्कीच कोणीतरी आपला शत्रू असेल.  
येथे मुठभर लवंगा लोकांना एक पैसात मिळतात.  येथे लवंगा कोण खरेदी करेल आणि 
आपण काय कमवाल...?

धर्मपाल म्हणाले की येथेही नफा आहे की नाही हे मला पहायचे आहे. 

माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत केलेल्या कोणत्याही व्यवसायात
नफा कमावला आहे. तर मला आता हे पहायचे आहे की त्यांचे आशीर्वाद इथेही कामी 
येतात काय...?

सुलतानने विचारले- वडिलांचे आशीर्वाद...?

याचा अर्थ काय...?
धर्मपाल म्हणाले की, माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि सत्यतेसह काम केले
परंतु त्यांना पैसे कमवता आले नाहीत. मरणाच्या वेळी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला देवाच्या नावाने आशीर्वाद दिला की तुझ्या हातातली धूळसुद्धा सोने होईल.

असे बोलतांना धर्मपाल खाली वाकला आणि त्याने मूठभर वाळू जमिनी वरून ऊचलली आणि सम्राट सुलतान समोर मुठ्ठी उघडली आणि वाळू त्याच्या बोटावरून खाली सोडली.

धर्मपाल आणि सुलतान दोघांनाही आश्चर्य वाटले.  त्याच्या हातात  सुलतानाची हरवलेली 

हिरेजडित अंगठी होती. अंगठी पाहून सुलतानाला खूप आनंद झाला. वाह देवा...!  
आपली शक्ती ओलांडली नाही. 
 
आपणही वडिलांचा आशीर्वाद खरा ठरविला.
धर्मपाल म्हणाले की... तोच देव फकीरांच्या आशीर्वादाने खरा आहे.
सुलतान खूप प्रसन्न झाला आणि त्याने धर्मपालला मिठी मारली आणि सांगितले की
मागा सेठ.  आज तूम्ही जे काही मागाल ते मी देईन.

 धर्मपाल म्हणाला की... तुम्ही अनेक अनेक वर्षे जगावे आणि तुमचे राज्य आनंदी होवो. 
या व्यतिरिक्त मला काहीही नको आहे. सुलतान आणखीन आनंदी झाला.
 तो म्हणाला की... सेठ मी सर्व सामान विकत घेतो आणि तुम्ही सांगाल ती किंमत देतो.

 शिक्षण -

 ही कथा शिकवते की... जर पुण्यवान आई वडीलांचा आशीर्वाद मिळाला

तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कोठेही पराभूत होऊ देणार नाही

 त्यांच्या आशीर्वादासारखी दुसरी कोणतीही संपत्ती नाही.

 ज्यांच्या आईने मुलाचे मन जाणून घेतले आहे आणि भविष्यातील गोष्टींची काळजी घेणारा 

पिता आहे ते जगातील दोन महान ज्योतिषी आहेत, फक्त त्यांचा आदर करा

मग तुम्हाला देवाकडून काहीही मागावे लागणार नाही.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी

Good Thoughts In Marathi - आयुष्य खुप सुंदर आहे - सुंदरतेने जगा - Marathi Suvichar